Thursday, June 3, 2021

पक्ष्यांची घरटी

 


         पावसाळ्याच्या आधी पक्ष्यांची लगबग सुरु होते. पावसाळा हा पक्ष्यांचा पिलांना जन्म देण्याचा काळ असतो. कारण  पावसाळ्यात अन्न, पाणी आणि आश्रयासाठी चांगली घनदाट झाडी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. म्हणून हा काळ पिल्लांचे संगोपन करायला सोयीचा असतो. पक्षी घरट्यासाठी एकदम सुरक्षित जागा निवडतात जिथे कोणताही भक्षक सहजासहजी पोहोचू शकत नाही. मी एकदा गोरेगावला चित्रनगरी मध्ये एका स्वर्गीय नर्तकाचे (Asian Paradised Flyacatcher) कपाच्या आकाराचे छोटेसे घरटे पहिले होते. त्याने ते घरट अत्यंत दाट झाडीत(Canopy) केल होत जिथे भरपूर डास होते. ह्या जागी भरपूर खाद्य असल्यामुळे आणि पिल्लांसाठी सुरक्षित जागा असल्यामुळे नर्तकाने घरट इकडे करायचं निश्चित केल होत. बारीक सारीक गोष्टी न्याहाळूनच पक्षी घरट करण्यासाठी जागा निवडतात.

        पक्षी घरटी बनवण्यासाठी झाडाच्या काड्या, वेगवेगळ्या wires, सापाची कात, झावळीचे हिरे आणि कोळ्याच्या जाळ्याचे तंतू यांचा वापर करतात. दोन दिवसांपूर्वीच माझ्या घराच्या खिडकीमध्ये एक नाचरा पक्षी कोळ्याच्या जाळ्याचे तंतू घेऊन जाताना दिसला. मी लगेच बाहेर जाऊन तो कुठे जातो आहे ते पाहिलं. माझ्या अपेक्षेप्रमाणे तो नाचरा पक्षी त्याच्या घरट्याकडे जाताना दिसला. तसेच एकदा नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये फिरत असताना मला एका सामान्य खाटिक (Common Woodshrike) या पक्ष्याने बिबट्याच्या विष्ठेतले केसाचा पुंजका उचलताना पाहिलं होत. त्याचा पाठलाग केल्यावर मला तो पक्षी आपल्या घरट्यात जाऊन ठेवताना दिसला. त्याने आपल्या पिलांसाठी मऊ गादी म्हणून केसांच्या पुंक्याचा उपयोग केला होता.

          पक्ष्यांची घरटी सुद्धा वेगवेगळ्या आकाराची असतात. कावळ्याचे घरटे हे फार ओबडधोबड असते. बुलबुल, नाचरा, कोतवाल  यांची घरटी कपाच्या आकाराची असतात. काही पक्षी जमिनीवरच अंडी घालतात. ह्यात टिटवी (Lapwing), रातवा (Nightjar) यांचा समावेश होतो. ह्या पक्ष्यांची अंडी उघड्यावर असतात तरीही त्यांना आपण सहजासहजी पाहू शकत नाहीत. अंड्यांचा मातकट रंग मातीशी मिळताजुळता असल्यामुळे त्यात ते मिसळून (camoflage) जातात. कडाक्याच्या उन्हाळ्यात अंडी करपून जाऊ नयेत म्हणून मादी टिटवी आपलं पोट भिजवते आणि परत अंड्यांवर अंडी उबवायला येऊन बसते. जेणेकरून अंडी करपणार नाहीत. काही पक्षी झाडावरच्या नैसर्गिक ढोलीचा घरटे म्हणून वापर करतात. यात घुबड, धनेश, तांबट पक्ष्यांचा समावेश होतो. मी माझ्या सोसायटीमधल्या एका जांभळाच्या झाडाच्या सुकलेल्या फांदीवर असलेल्या छोट्याश्या ढोलीमध्ये तांबट पक्ष्याने घरट केलेलं पाहिलं होत. तर काही पक्षी चोचीने झाडाच्या खोडावर ढोली तयार करतात. यात सुतार पक्षी तरबेज असतो. त्याची चोच सुद्धा एकदम दणकट असते. खोडावर चोच आपटल्यावर drum वाजवल्यासारखा आवाज येतो म्हणूनच याच्या आवाजाला drum sound म्हणतात. जंगलात किंवा गावात असे आवाज हमखास ऐकायला मिळतात. तसेच शिंपी पक्षी दोन पान शिवतो आणि त्यात कापसाची गाडी बनवतो. त्यावर अंडी घालतो. मी एकदा माझ्या कॉलेज मध्ये शिंपी पक्ष्याच्या घरट्यात दोन अंडी घातलेली पहिली होती. पण लोकांची रेलचेल(human interference) जास्ती असल्यामुळे त्यांनी ते घरटे अर्धवट सोडून दिले.

 तसेच सुगरणीचे घरटे बघण्यासारखे असते. घरट्यात जायला खालच्या बाजुने प्रवेश केलेला असतो. हे भक्षकाला पटकन कळत नाही. त्यामुळे त्यांची पिल्ल सुरक्षित राहतात. सुगरणींच्या घरट्याला बाजूला एक खळगा केलेला असतो. त्या खळग्यात पक्षी अंडी घालतात. हा खड्डा पश्चिमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला बांधला जातो. जेणेकरून वार्यामुळे आतमधली अंडी बाहेर पडणार नाहीत. सुगरणीच घरट पाहिलं की बहिणाबाई चौधरींच्या खोपा या कवितेमधली दोन कडवी आठवतात.

खोपा इनला इनला

जसा गिलक्याचा कोसा

पाखराची कारागीर

जरा देख रे माणसा!

 

तिची इवलीशी चोच

तेच दात, तेच ओठ

तुला देले रे देवानं

दोन हात दहा बोट!

पक्ष्यांसारखी भक्कम, मजबूत आणि अतिशय सुभग अशी घर माणूस बांधू शकत नाही. निसर्गामध्ये प्रत्येक जीवाला एक अजब देणगी दिलेली आहे. 

 

 

        

Friday, January 15, 2016

Post from Lata Aji

१४/१/२०१५

तुम्ही सर्वांनी BLOG वर माझ्याशी केलेल्या गप्पा आवडल्या. आपलं जगणं अधिक

सकस करायचे कष्ट करताहात याचा खूप आनंद झाला. जगणं सकस करायचं तर

आधी आपण आला दिवस कसा घालवतो आहोत याकडे डोळ्याला डोळा भिडवून

पाहयला हवं. इथं भ्याडपणा चालत नाही. ते धैर्य तुमच्यात आहे.

जगण्यात आनंद भरलेलाच असतो. तो आपला आपणच हरवून टाकतो. बेजबाबदार,

स्वार्थी जीवनशैलीपायी तो हरवतो. आनंद हरवला, की जगणं म्हणजे निव्वळ चिखल

बनत. पाणी आणि माती ही दोन्ही पंचमहाभूतांपैकीच. नवनिर्माणाची अपार क्षमता

या दोघांपाशी आहे. पण त्याचा जर चिखल केला तर त्यात उत्तम बीजही कुजून 

जात.

उत्क्रांतीच्या वाटेवर  आपल्याला हा नवा विकसित मेंदू  लाभला. त्याच्या मदतीनंच  माणसानं 

जगणं सुखकर करण्यासाठी नाना शोध लावून तंत्रज्ञान विकसित केलंय. पण सुखकर जगणं हवं,

तर आधी ते आपणं सुसह्य केलं पाहिजे. स्वार्थ, निराशा, द्वेष हे सारे जिणं नकोसं करतात. या

नव्या मेंदूतून लाज, द्वेष अशांसारख्या नव्या भावना माणसात उपजल्या. लाज सोडली, की

आपण कोडगे होतो. संवेदनशीलताच मनोमन हरवून बसतो. द्वेषाची आग तर सारंच  जाळून

टाकते. आनंदाची छोटीशी झुळूकही आपल्याला निवांत करते. आपल्या वाटल्या अनेक माणसं

योगायोगाने येतात. आपणं त्या साऱ्यांना स्वीकारुया. त्यांच्याशी प्रेमानं वागलो, तरच ज्याचा

आपल्याला त्रास होतो असे त्यांच्यातील दोष दूर करायचा ते प्रयत्न करतील. दुसऱ्यांनी

आपल्याला सुखी करावं ही अपेक्षा करण्यापूर्वी  आपणं आधी ते जसे आहेत तसेच त्यांना

स्वीकारुया. त्यानं आपलीच ताकद वाढते. आपणं हळुहळू  सर्वांवर निरपेक्ष प्रेम करू लागतो. 

जगण्यातला सगळा आनंद या निरपेक्ष प्रेमात साठवलेला आहे.

आपलं जगणं आणि वागणं पारदर्शक  ठेवणं हे आपलं संसारातलं आद्य कर्तव्य आहे. जेव्हा

आपल्याला स्वत:च एखाद वर्तन चोरून करावंसं वाटत, तेव्हा ते बहुधा अनैतिक असत.

आपल्या  वाट्याला आलेल्या भल्याबुऱ्या माणसांचा आणि सुखदुःखाचा सहज स्वीकार करत

आपणं जगायला हवं. एकदा एका पालकानं  मला छान सांगितलं, ती म्हणाली, ‘ देव

आपल्यासमोर वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटना एखाद्या स्लाईड शो सारख्या ठेवतो आणि

विचारतो , ‘याला क्षमा करशील  अशी  शीलता अंगी बाणवत ती मुलगी आज जगते आहे.’

‘व्यथा असो, आनंद असू दे

प्रकाश किंवा तिमिर असू दे

वाट दिसो अथवा न दिसू दे

गात पुढे मज जाणे’

या श्री. मंगेश पाडगावकरांच्या ओळी त्यांनी स्वत:च्या  जगण्यातून आपल्याला दाखवल्या,

जीवनात सुखदु:ख  आहेच, पण ते सारे निसर्गाचे ‘बहाणे’ आहेत. हे ओळखल्यावरही 

‘डोळ्यामधले आसू पुसती ओठांवरले  गाणे’ अशी परिस्थिती त्यांच्यावरही वारंवार येतच

राहिली. पण त्यांनी स्वत:चे आतलं गाणे हरवू दिले नाही. पाडगावकर गेले पण स्वत:च्या

काव्याप्रमाणे स्वत:च्या जगण्यातूनही त्यांनी जगण्यावर प्रेम करून निकटवर्तीयांना दाखवलं.

त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी म्हणाली, जगण्याला लायक केलं बाबांनी मला.’

हे सारं जमवत जमवत जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं. आपणही जीवनातला आनंद हरवू न

देता जगूया आणि दुसऱ्याच्या आनंदाआड न येण्याबाबतही आपण दक्ष राहूया.

-Lata Aji

Tuesday, January 5, 2016

मी ज्ञानेश्वरी वाचत असते तेव्हा तेवढ्या काळापुरतं तरी मला जगनमाऊलीच्या कुशीत विसावल्यासारखं निवांत वाटतं. खूप शांत शांत वाटतं. माझ्या आणि ज्ञानेश्वरांच्या मनमुराद गप्पा होतात.
काल वाचता वाचता ज्ञानेश्वरांच्या एका दृष्टांतानं मी अगदी चकीत झाले. विषयवासनेनं खुळावलेल्या आणि त्यापायी अत्यंत हीन पातळीवरचं जिणे जगणाऱ्या माणसाचं त्यात वर्णन होतं. त्या माणसांना ज्ञानेश्वरांनी ‘पूयपंकीचे किडे’ असं म्हटलंय. पूयपंक म्हणजे जुनाट, चिघळलेल्या जखमेच्या पृष्ठभागावर जमलेला पुवाचा चिखल. ज्ञानेश्वरांची विज्ञानाची जाण पाहून मी अगदी नतमस्तक झाले.
पुयपंकीचे किडे म्हणजे वैज्ञानिक परिभाषेत Anaerobic bacteria’. हे जीवजंतू पुवाच्या चिखलातच वाढू शकतात. त्यातील गोम अशी की पुवाच्या चिखलात प्राणवायूचा अभाव असतो. म्हणूनच ते वाढू शकतात. प्राणवायूशिवाय ते मजेत जगतात आणि आपली प्रजा वाढवतात.
हे वाचताना माझ्यातलं शहाणपण म्हणालं, हे जिणे तुझ्या जिण्यासारखच की? अवतीभवती इतकं हवेच प्रदूषण आहे. अन्न, पाणी सारे दूषित आहे. भयावह वाटाव इतका भ्रष्टाचार, शोषण, सारं बोकाळलंय, तरी तुम्हाला कुठं त्यापायी गुदमर जाणवतेय? तुम्ही सारेच अगदी मजेत जगताय की.’
बापरे! म्हणजे ज्ञानेश्वर मला माझीच पातळी दाखवताहेत तर नाही. मी माझीच सफाई माझ्या शहाण्या मनासमोर मांडू लागले. त्याला म्ह्टलं, ‘काय वाईट आहे त्यात? एवढया पुयपंकात मजेत जगतो आहोत हे कसं काय वाईट? ते ‘anaerobic bacteria’ प्राणवायूच्या अभावातही टिकून राहाताहेत. माणसानं अक्कल हुशारी वापरुन शोधून काढलेल्या नवनवीन प्रभावी एण्टीबायोटीक्सना दाद न देता जगताहेत. आपली प्रजा ते अधिक कणखर, जगण्यालायक बनवताहेत.’

त्यावर माझं शहाण मन उत्तरलं, ‘अवतीभवतीच्या उपभोगांच्या झमेल्यात, बेगडी दुनियेत रमल्यानं एका मह्त्त्वाच्या गोष्टींचा विसर पडतोय तुला. ज्ञानेश्वरी वाचताना सगळ अवधान एकवटून वाचत चला, असं ज्ञानेश्वर वारंवार बजावताहेत नं? पण अहंकार थोडा बाजूला ठेवून विचार करणे जमतच नाही तुला अजून. हे पुयपंकीचे किडे जगतात. अगदी भराभरा प्रजा वाढवतात हे खरं. पण अवघा जन्म माणसांना रोगी बनवण्यातच जातोय त्यांचा. प्रजननासोबत आपल्याजातीची विषप्रवृत्तीच वाढवायचा खटाटोप चाललाय नं त्यांचा? सारी शक्ती या दोन गोष्टीतच घालवताहेत ते.
त्या किड्यासारखं जगायचं आणि वर त्या जीवनशैलीचाच अभिमान बाळगायचा तर इतका उत्क्रांत मानव जातीतला जन्म हवाच कशाला तुला?

----- लता काटदरे

Monday, January 4, 2016

वाटेवरचं हे सोनमोहोराचं झाड.
ऐन शिशिरात, असं एकाच फांदीवर
पिवळेजर्द गुच्छ मिरवत,
झुलवत रमलेल पाहिलं,
तेव्हा वाटलं....
हे झाड किती जुनं! अगदी माझ्यासारखंच
म्हातारं आहे हे.
किती ऋतूचक्र उपभोगली, सोसली असतील
आजवर त्यानं.
त्याचं नुसत्या वसंताच्या चाहुलीनं या वयात
असं लुटुपुटुच बहरणं किती छान ! किती सुंदर !
क्षणभर हेवा वाटला त्याचा.
आठवणींच्या खेळातच विसावा शोधायचं
खरं तर त्याचं वय.
या वयातही असं फुलता येत कोणाला ?
मी त्याच्याकडे कौतुकाने पाहिलं,
तेव्हाही ते माझ्या जरठपणाला
हसत नव्हतं, हिणवत नव्हतं.
हेही किती कठीण नं !
एकदा  वाटलं, इतकं आत्ममग्न
जगत राहिल्यावर इतरांची
वर्दळ, लगबग जाणवणारच कशी याला ?
पण लगेच ध्यानात आलं की
हे आत्ममग्न पण नाही त्याचं.
हे आहे ‘स्वस्थपण’
या स्वस्थपणातच
हे असं बहरणं झुलणं जमू शकतं
अगदी आपोआप.

----- लता काटदरे 

Tuesday, December 29, 2015


In our last teen age shibir meeting Lataaaji pointed out that we need to take far more efforts to remain in touch with each other. While everybody agrees on this; the perceived problems have been physical difficulties in arranging meetings etc.One obvious solution is to exchange thoughts on blog, but this also has not picked up much.

I want to suggest something which might be part of solution. For past couple of years, I have been using website www.coursera.org . This is free website (registration required) on which various universities from all over the world upload their academic courses.Anybody (irrespective of your current academic qualification) can enroll for these courses.

These are typically short term courses of few weeks or months and video lectures are available for you to view (with English subtitles in most cases so that problem of understanding accent does not arise). There are short tests to be attempted at the end of week (optional) and discussion forums in which people from all over the world who are taking the course currently interact with each other.

Right now we (me & Sangeeta) are taking course called "Positive Psychology" conducted by University Of North Carolina. It's a 6 week course. It focuses on effect of positive emotions on your well being and how these could be cultivated etc. If anybody wants to join the course now, it would be great way to connect and interact with each other. We will have something concrete to talk about and share and all of this could be done on the blog so that others can share it.

Do let me know if you enroll or if you face any problem in enrolling.

Saturday, December 19, 2015

Charles Correa's Bharat Bhavan

Hi everyone,
We are in Bhopal super excited with the magnificient display of art and culture at various galleries. One such grand gallery being Bharat Bhavan,  designed by Charles Correa. The meaning of creation of 'space' as was discussed in teenagers shibir was very clear. You just enter into a space, move around from any where to anywhere with no charted routes. Later on you realise you were moving from one gallery to the other viewing exhibits of eminent artists like Prabhakar Kolte, Prabhakar Barve, Bendre etc, to the budding artists as also the grand colorful and cheerful paintings by the Gond tribals.
In between are  cute spaces like stairs and
slopes where you can just sit and
contemplate. The best use of natural elements like the lake view, open to sky areas make the whole experience a serene one.
Grateful once again to Lata Aji for helping us broaden our vistas and thanks to Anita Punjabi and Amit Phansalkar for their efforts to showcase Charles Correa.

Sunday, December 13, 2015

‘A Bronx taleचित्रपटाविषयी आणखी थोडेसे----

चित्रपट पाहून मला काही प्रश्न पडले आहेत.

आठ वर्षे तो मुलगा सोनीच्या संपर्कात असतो. या आठ वर्षात त्याच्या बाबांचे आणि त्याचे नाते कसे असते याचा काहीच थांगपत्ता चित्रपटात लागत नाही. बाबाला तो सातत्याने सोनीच्या संपर्कात आहे हे कळत नाही का? कळत असेल तर त्यांच्या दोघांच्या नात्यात या काळात काहीच 'खळबळ' होत नाही का? आठ वर्षे, ती सुद्धा अशा वाढत्या वयाची, ही दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नाहीत. क्षणभर असे गृहीत धरले की बाबा हे सर्व संयमाने स्विकारतो, मुलावरील आणि स्वतावरील आपला विश्वास आणि प्रेम तो जराही कमी होऊ देत नाही, तरी एक प्रश्न उरतोच.

त्याच्या आईची या सगळ्या घटनावर काय प्रतिक्रिया होती? आई नोकरी करताना दाखवलेली नाही. तिला तर डोळ्यादेखत तिचा वाढत्या वयाचा मुलगा गुंडांच्या सहवासात दिसत असणार.  एका बस चालकाबरोबर ती समजून उमजून संसार करत असते आणि त्यात ती समाधानी आहे असेही एका दृश्यात दाखवले आहे. पण समाधानी असणे वेगळे आणि मुलाच्या भवितव्याविषयी काळजी नसणे वेगळे. चित्रपटात आईच्या जीवाची घालमेल अजिबात दिसत नाही. प्रत्यक्षात आई याबद्दल खूप काळजी करणारी आणि कदाचित त्या काळजीपोटीच काही वेळा उतावीळ होऊन 'overreact' होताना आपल्याला दिसते. 

प्रामुख्याने वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर चित्रपटात भर दिलेला आहे हे मान्य केले तरी आई- बाबा दोघे मिळून (as a marriage) ह्या सगळ्या प्रसंगांना सामोरे जातात का ? जात असल्यास कसे सामोरे जातात ? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. त्या दोघामधला मुलाविषयीच्या कळकळीचा काहीच संवाद चित्रपटात नाही.

त्यामुळे चित्रपट पाहून झाला तरी काहीतरी पोकळी जाणवत होती. मात्र शिबिरात झालेल्या चर्चेत आयाच अधिक आणि अगदी मनापासून बोलल्या त्यामुळे ही पोकळी भरून निघाली. मी चित्रपटातील जी उणीव दाखवत आहे तीच त्यांच्या बोलण्यातून एकप्रकारे अधोरेखित झाली. असो. 

ह्या साऱ्यामुळे चांगला चित्रपट पाहणे आणि त्यावर अशी चर्चा करणे हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे हे परत एकदा लक्षात आले.  


---विकास परांजपे