Friday, August 17, 2012


आदरणीय लता आजी आणि अनिल आजोबा,

        आपल्याकडे झालेली दुर्घटना ऐकून धक्का बसला आणि फार वाईट वाटले. पण लता आजी आणि अनिल आजोबा सुखरूप आहेत, हे एकून बरे वाटले. अगदी न राहवून गार्गी ला पण फोन केला. दुर्घटना नेहमीच वाईट असते पण त्यात नेमके प्रसंगावधान दाखवून आजी आणि आजोबांनी परिस्थिती हाताळली. पण त्यांना ज्या मानसिक धक्यातून जावे लागले, त्याची कल्पना करवत नाही. लता आजी शिबिरातील प्रत्येकासाठीच नेहेमी भरभरून करतात आणि त्यांना हा त्रास व्हावा, ऐकून फार वाईट वाटले. या घटनेतून सावरण्यासाठी काही प्रयत्न करावा, असे मनापासून वाटते.

        तुम्ही दोघे या  धक्यातून लवकर सावरावे, अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो.

जयश्री आणि महेन्द्र.

No comments:

Post a Comment