Thursday, August 16, 2012


प्रिय लताआजी व अनिल आजोबा,
शनिवारच्या दुर्घटनेबाबत कळल्यावर आम्हांला खूप भिती वाटली व सर्वप्रथम आपल्या दोघांच्या व घरातील इतरांच्या सूरक्षेबाबत काळजी वाटली. आपल्याला काही शारिरीक इजा झाली नाही हे समजल्यावर हायसेही वाटले व आम्ही मनोमन देवाचे आभार मानले.
आपण दोघांनी त्यावेळी परिस्थिती कशी हाताळली असेल? आग विझेपर्यंत व सुखरुप बाहेर पडेपर्यंत तुमची मनस्थिती काय झाली असेल याचा आम्ही सतत विचार करत होतो.
आम्हाला खूप भेटावेसे वाटत होते वा गार्गीला फोन करून विचारपूस करावीशी वाटत होती परंतु त्यावेळी ते उचित वाटले नाही.
आम्हाला या प्रसंगातील आमच्या बेजबदारपणाची अत्यंत लाज वाटत आहे.
आपण या मानसिक धक्क्यातून लवकर सावरावे अशी देवाकडे प्रार्थना.
-संगिता आणि अजय

No comments:

Post a Comment